Festival Posters

रिक्षा चालकापासून स्वतःला वाचवायला तिने मारली चालत्या रिक्षातून उडी

Webdunia
शुक्रवार, 21 जून 2019 (10:05 IST)
रिक्षा चालकांचा त्रास अनेकदा प्रवासी वर्गाला होतो. असाच संतापजनक प्रकार शहरात घडला आहे. रिक्षा प्रवासात रिक्षाचालकाने गाडीत बसलेल्या तरूणीचा विनयभंग केला त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने स्वतःची अब्रु वाचविण्यासाठी धावत्या रिक्षातून उडी मारली आहे. त्यामुळे ही तरुणी जखमी झाली आहे. या गंभीर प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला पकडले आहे.
 
सविस्तर वृत्त असे की रिक्षाचालक शयित रिक्षाचालक रवि शंकर गोफणे (वय-22, रा. गौतमनगर, रामायण हॉटेल मागे, गरवारे पॉइर्ंट, अंबड, नाशिक) याच्या  एम.एच.15Ak 6685 रिक्षा मधून घटनेतील पिडीत युवती गरवारे पॉइंट शेजारील आंगण हॉटेल, महाराष्ट्र बँकेसमोर्रोन सर्व्हिस रोडवरून जात होती, त्यावेळी रिक्षात कोणी इतर प्रवासी नसतांना गोफणे याने तरुणीला तिचा हात पकडत ‘तु, मुझे अच्छी लगती है.’ असे म्हणुन चालु गाडीत तिचा विनयभंग केला. मात्र त्याला खडसावत त्याला रिक्षा थांबविण्यास युवतीने सांगितले होते. मात्र, त्याने रिक्षा न थांबवता वेगात पुढे नेली त्यामुळे घाबेलेल्या तरुणीने जीव वाचवायला चालत्या रिक्षातून उडी मारली आहे. या घटनेत तिच्या चेहर्‍याला, उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. हा सर्व प्रकार रस्त्यावरील नागरिकांच्या लक्षात आला, काहींनी रिक्षाचा पाठलाग केला आणि त्या रिक्षाचालकाला पकडले व चांगलाच चोप दिला. त्यांतर या रिक्षाचालकाला पोलिसांच्या स्वाधिन केले. या प्रकरणातील जखमी युवतीला रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी रिक्षा जमा करवून घेत त्यास ताब्यात घेतले व गुन्हा नोंदवला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

उद्धव यांनी रोज रामरक्षा वाचायला हवी… मुख्यमंत्री फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर

बच्चू कडू यांनी राज्य सरकार कडे राजुरा पुनर्वसन आणि वासनी सिंचन प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला

भारतातील ४५% घरे इलेक्ट्रिक कार चार्जिंगसाठी सुरक्षित नाही

LIVE: वर्ध्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार, २१ जनावरांचा मृत्यू

मुंबई विमानतळावर ६ कोटी रुपयांचे सोने जप्त, महिला प्रवाशाला अटक

पुढील लेख
Show comments