Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिक्षा चालकापासून स्वतःला वाचवायला तिने मारली चालत्या रिक्षातून उडी

Webdunia
शुक्रवार, 21 जून 2019 (10:05 IST)
रिक्षा चालकांचा त्रास अनेकदा प्रवासी वर्गाला होतो. असाच संतापजनक प्रकार शहरात घडला आहे. रिक्षा प्रवासात रिक्षाचालकाने गाडीत बसलेल्या तरूणीचा विनयभंग केला त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने स्वतःची अब्रु वाचविण्यासाठी धावत्या रिक्षातून उडी मारली आहे. त्यामुळे ही तरुणी जखमी झाली आहे. या गंभीर प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला पकडले आहे.
 
सविस्तर वृत्त असे की रिक्षाचालक शयित रिक्षाचालक रवि शंकर गोफणे (वय-22, रा. गौतमनगर, रामायण हॉटेल मागे, गरवारे पॉइर्ंट, अंबड, नाशिक) याच्या  एम.एच.15Ak 6685 रिक्षा मधून घटनेतील पिडीत युवती गरवारे पॉइंट शेजारील आंगण हॉटेल, महाराष्ट्र बँकेसमोर्रोन सर्व्हिस रोडवरून जात होती, त्यावेळी रिक्षात कोणी इतर प्रवासी नसतांना गोफणे याने तरुणीला तिचा हात पकडत ‘तु, मुझे अच्छी लगती है.’ असे म्हणुन चालु गाडीत तिचा विनयभंग केला. मात्र त्याला खडसावत त्याला रिक्षा थांबविण्यास युवतीने सांगितले होते. मात्र, त्याने रिक्षा न थांबवता वेगात पुढे नेली त्यामुळे घाबेलेल्या तरुणीने जीव वाचवायला चालत्या रिक्षातून उडी मारली आहे. या घटनेत तिच्या चेहर्‍याला, उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. हा सर्व प्रकार रस्त्यावरील नागरिकांच्या लक्षात आला, काहींनी रिक्षाचा पाठलाग केला आणि त्या रिक्षाचालकाला पकडले व चांगलाच चोप दिला. त्यांतर या रिक्षाचालकाला पोलिसांच्या स्वाधिन केले. या प्रकरणातील जखमी युवतीला रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी रिक्षा जमा करवून घेत त्यास ताब्यात घेतले व गुन्हा नोंदवला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता पोलिस हवालदारांनाही गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार

२४ मे रोजी, १४ किमी/सेकंद वेगाने एक अंतराळ राक्षस येत आहे, नासाने म्हटले आहे - सतर्क रहा

पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा यांनी माफी मागावी, भाजप नेत्यांच्या टीकेवर हर्षवर्धन सपकाळ संतापले

इंडोनेशियातील पापुआमध्ये सुरक्षा दल आणि बंडखोरांमध्ये चकमक, 20 हून अधिक जण ठार

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता पोलिस हवालदारांनाही गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार

पुढील लेख
Show comments