Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ ७ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले

Webdunia
गुरूवार, 22 जुलै 2021 (08:11 IST)
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिक देखील लसीकरणासाठी गर्दी करू लागले आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर नेहमीच वाद झाल्याचे पाहायला मिळते. आता लसीसाठी चक्क आंदोलन केले जाऊ लागले आहे.
 
महाराष्ट्रात लसीकरणबाबत विक्रम रचल्याचे दावे केले जात आहे. आरोग्य विभाग सांगते की राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त लसीकरण झाले आहे, मात्र अहमदनगर शहरात लसीकरण अत्यंत संथ गतीने सुरु आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ ७ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
या आठवड्यात तीन दिवस लस उपलब्ध झाली नाही. लसीकरण बंद राहिले. नागरिक वैतागले आहेत. खासगी रुग्णालयात पैसेही भरले आहे.
मात्र त्यांना लस देण्यात आलेली नाही. यालाच वैतागून नागरिक जागरूक मंचातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. लसीकरण जर चालू ठेऊ शकत नसेल तर लॉकडाऊन ही चालू ठेऊ नका असे फलक लावत आंदोलन करण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

International Museum Day 2025: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन इतिहास आणि महत्व जाणून घ्या

LIVE: आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा

आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा, एकत्र येण्याचे संकेत

भारताची अव्वल खेळाडू श्रीजा अकुला टेटे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पराभूत

पुढील लेख
Show comments