Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेनेच्या मंत्र्याने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

Webdunia
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020 (15:55 IST)
राज्यापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत ही राज्य सरकार विरुद्ध भाजप असा सामना पाहण्यास मिळाला. भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर एकही टीकेची संधी सोडली नाही. परंतु, गेल्या सात महिन्याच्या कालखंडात पहिल्यांदाच शिवसेनेला नेते थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचला आहे.
 
शिवसेनेचे मंत्री अनिल परब हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहे. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खास निकटवर्तीय आहे. अनिल परब हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 
अनिल परब यांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते.
 
आज विधिमंडळाचे कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार केल्याची  माहिती अनिल परब यांनी दिली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं परब  यांनी सांगितले आहे. परंतु, गेल्या सात महिन्याच्या कालखंडात सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री हे थेट विरोधी पक्षाच्या नेत्याला भेटीला आल्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.
 
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. खुद्द सुप्रिया सुळे यांनी आशिष शेलार हे भेटीला आले होते, याबद्दल माहिती आणि फोटो शेअर केला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments