Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाद दुसऱ्यांचा गोळीबारात निष्पाप माणसाचा जीव गेला

Webdunia
बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (10:32 IST)
पुणे येथील हडपसर परिसरातील गंगानगर येथे झालेल्या गोळीबारात एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला असून, त्यांचे नाव पंचया सिध्या स्वामी(वय 60) असे आहे. यातील गुंड असलेले मयूर गुंजाळ आणि तेजस कल्याणी या दोघांमधील वादामुळे या तिसऱ्या निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.
 
मयूर गुंजाळ आणि तेजस कल्याणी या दोघांमध्ये जुन्या भांडणातून रस्त्यात मारामारी होत पुन्हा वाद सुरु झाला, वादाचे रुपांतर गोळीबारात झाले. कल्याणी याने मयूर गुंजाळ याच्या दिशेने गोळीबार केला. यात  नेम चुकला आणि ही गोळी थेट फूटपाथ वरून जात असणाऱ्या वयोवृद्ध स्वामी यांच्या पायाच्या पंजाला लागली. त्यानंतर त्यांना तत्काळ नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, मात्र त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने हॉस्पिटलमध्येच त्यांचे निधन झाले आहे. घटनास्थळी हडपसर पोलिस स्टेशनचे अधिकारी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments