Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खडकवासला धरणाचे दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Webdunia
बुधवार, 4 सप्टेंबर 2019 (15:42 IST)
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आतापर्यंत खडकवासलातून २२ हजार ८८० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता, पण आता 27 हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. मुळशी धरणातूनही 10 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. परिणामी, नदी पात्रातील पाण्यात वाढ झाल्याने डेक्कन येथील बाबा भिडे पुल पाण्याखाली गेला आहे. दिवसभरात दोन्ही धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
 
पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण देखील 100% भरले आहे. मावळातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही पूल पाण्याखाली गेल्याने येथील काही गावांचा जनसंपर्क तुटल्याची माहिती आहे. तर, लोणावळ्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून रात्रभरात 210 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पवनाधरण क्षेत्रात 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळशी धरणाच्या परिसरातही जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणातून सकाळी 7 वाजता 10 हजार क्युसेक पाणी मुळा नदीत सोडण्यात येत होते. सकाळी 8 वाजता त्यात वाढ करुन 15 हजार क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

भोपाळमध्ये अनेक विद्यार्थिनींशी मैत्री केल्यानंतर बलात्कार, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले

सुरक्षा दलांनी बांदीपोरा जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

महिलांनी टिकल्या काढल्या अल्लाह हू अकबर'च्या घोषणा दिल्या पीडितांनी वेदना व्यक्त केल्या

पुढील लेख
Show comments