Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबादचा कन्नड घाट दरड कोसळून ठप्प, भिलदरी पाझर तलाव फुटला

Webdunia
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (12:48 IST)
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात दरड कोसळली आहे. त्यात कोणतीही जिवीतहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. मात्र अनेक गाड्यांवर दरड कोसळल्याने नुकसान झालं आहे. तसंच महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून अनेक गाड्या रात्रीपासून अडकल्या आहेत.

सध्या धुळे-औरंगाबाद-सोलापूर महामार्ग ठप्प आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून दरड हटवण्याचं आणि गाड्या काढण्याचं काम सुरू आहे. परंतु सततच्या पावसामुळे कामात अडथळा येत आहेत. तसंच रस्त्यावर सगळीकडे चिखल झाल्याने गाड्या अडकल्या आहेत.

सोमवारपासून औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडतोय. कन्नड घाटातही रात्रभर पाऊस कोसळत होता.
 
धुळे-औरंगाबाद महामार्ग बंद असल्याने पोलिसांनी पर्यायी मार्गाने प्रवास करावा असं आवाहन केलं आहे. औरंगाबाला जाण्यसाठी चाळीसगावमार्गे प्रवास करावा तर पुण्याहून औरंगाबादला जायचे असल्यास जळगाव मार्गाने जावं, संही आवाहन करण्यात आलं आहे.
 
मुसळधार पावसामुळे भिलदरी पाझर तलाव फुटला असून आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. नागद गावातील परिस्थिती भीषण असल्याची माहिती समोर येत आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments