Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकारचं काम संथगतीनं सुरू – डॉ. भारती पवार

Webdunia
बुधवार, 5 जानेवारी 2022 (09:01 IST)
राज्य सरकारने लसीची मागणी केली आहे. आम्ही राज्याच्या मागण्या पूर्ण करत आहे. आता राज्याने काम करण्याची गरज आहे. सध्या राज्य सरकारचे काम संथ गतीने सुरू आहे. राज्य सरकार काम करत आहे परंतु राज्य सरकारने आपल्या कामाची गती वाढवली पाहिजे, असे मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ओमायक्रॉनबाबत आज केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी आढावा घेतला आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर काय काळजी घ्यायला हवी तसेच त्या त्या राज्यांनी काय निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. या संदर्भात राज्याने वेळीच पावले उचलायला हवी.
 
प्रत्येक राज्यावर केंद्राचं लक्ष आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास लॉकडाऊन करण्याचे अधिकार राज्याला दिले आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून त्यांनी या संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहे. आताच काळजी घेतली तर प्रसार रोखता येईल. यासाठी केंद्र सरकार सातत्याने नियमावली देत आहे. केंद्रीय आरोग्य सचिव सर्व राज्यातील आरोग्य सचिवांसोबत चर्चा करत आहे, असे देखील डॉ. भारती पवार या वेळी म्हणाल्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: रामदास आठवले म्हणाले भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

बुलढाणा जिल्ह्यातील धमक्यांना कंटाळून प्रियकराने केली आत्महत्या... तीन वर्षांच्या प्रेमकथेचा दुःखद अंत!

पालघरमध्ये भीषण अपघातात बहीण-भावाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments