Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तेव्हा उद्धव ठाकरे कॅमेरा घेऊन जंगलात फिरत होते : निलेश राणे

Webdunia
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (15:41 IST)
राजकारणात आम्ही इन्क्युबेशन सेंटर म्हणजेच उबवणी केंद्र उघडले होते. परंतु आम्ही नको ती अंडी उबवली असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणै दौऱ्यात एका कार्यक्रमात केलं. मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता हा भाजपला टोला लगावला आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपशी युती ही बाळासाहेबांनी जपली आहे. तेव्हा उद्धव ठाकरे कॅमेरा घेऊन जंगलात फिरत होते असा घणाघात निलेश राणेंनी केला आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्ही नको ती अंडी उबवली त्याचे पुढे काय झाले तुम्ही बघता आहात असे वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधला होता. यावर निलेश राणेंनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पलटवार केला आहे. मुख्यमंत्री काय बोलतात हे कळण्यासाठी ट्रान्सलेटरची गरज लागते. भाजपशी युती ही बाळासाहेबांनी जपली आहे. २५ वर्षे बाळासाहेबांनी युती जपली, त्यावेळी १९९५ पर्यंत उद्धव ठाकरे जंगलात कॅमेरा घेऊन फिरत होते. त्यावेळी ते राजाकारणात कुठेच नव्हते. त्यांचा संबंध कुठेच नव्हता मग भाजपशी उद्धव ठाकरे यांचा संबंध काय? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments