suvichar

पारदर्शकता होती, म्हणूनच अजित पवार परत आले

Webdunia
गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (21:39 IST)
२०१९ वेळी भाजप सत्तेसाठी खुप डिस्परेट होती, त्यामुळे ते कोणालाही हाताशी धरू पाहत होते, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी भाजप त्यावेळी उत्तेजित होती. ज्या अर्थी शरद पवार सांगतात त्या अर्थी हे खरं म्हणावं लागेल, कारण मोदींनी शरद पवारांना सत्ता स्थापनेसाठी आग्रह केला होता, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
 
ते नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. २०१९ च्या सत्तेस्थापनेबद्दल बोलताना म्हणाले कि, भाजप त्यावेळी सत्तास्थापनेसाठी उत्तेजित होती. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी याच्याशी बोला, त्याच्याशी बोला, याला फोडा, अजित पवार ला गाठा असे उपक्रम त्यांनी केले. शरद पवारांशी देखील याबाबत बोलणे झाले. मात्र आमच्यात सगळ्या गोष्टीबाबत चर्चा होत असल्याने प्रत्येकवेळी भाजप तोंडघशी पडत होते. कोण कुणाला भेट्तय, कोण कोणाशी बोलतंय हे आम्हाला माहिती होत, त्यामुळे आमच्यात पारदर्शकता होती.. त्यामुळे भाजपचे सरकार स्थापू शकले नाही. अजित पवार गेले, त्यात देखील एक पारदर्शकता होती, असेही ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले कि मनमोहन यांच्या काळात कोणावर ही हेतू पुरस्कर कारवाई झाली नाही, तर लाल बहाद्दूर शास्त्री नंतर इतका निष्कपट पंतप्रधान मी बघितला नाही, आज ज्यांचे घोडे उधळले आहेत, त्यांना एकेकाळी पवार यांनी वाचवलं आहे, राजकारणात संयम महत्वाचा असतो, त्यामुळे राजकारणात मधांद हत्ती प्रमाणे वावरू नये, हत्तीही कोसळतात., असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
 
दरम्यान यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या संचारबंदीविषयी म्हणाले कि, रात्रीची संचारबंदी सुरू आहे, मात्र दिवसा संचारबंदी होऊ नये अशी इच्छा आहे, कारण सकाळी संचारबंदी लागली तर आर्थिक चक्र थांबेल. सुप्रिया, सदानंद सुळे, प्राजक्त तनपुरे, वर्षां गायकवाड यांना देखील कोरोना ची लागण झाली आहे त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात जाताना काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख