Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्र्यंबकेश्वर: बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण जखमी; बिबट्याचा शोध सुरू

Webdunia
शनिवार, 9 मार्च 2024 (09:05 IST)
त्र्यंबकेश्वर - तालुक्यातील पिंपरी येथे आज सायंकाळी शेतामध्ये काम करणाऱ्या एक महिला आणि एक पुरुष यांच्या वर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
नाशिक तालुक्यासह शेजारी असलेल्या त्र्यंबकेश्वर, निफाड, इगतपुरी, सिन्नर या परिसरामध्ये सातत्याने बिबट्याच्या वावर हा सुरूच आहे. सातत्याने होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, आज मौजे पिंपरी येथे काळू सोमा वाघ (वय 45) यांचे मालकी गट नंबर 232 मध्ये सायंकाळी 4.45 वाजता अचानक बिबट्याने हल्ला करून पाठीवर, हातावर पंजा मारून जखमी केले. त्यानंतर शेजारी असलेल्या ताराबाई विठ्ठल मूर्तडक (वय 35) यांच्या मालकीच्या गट नंबर 260/3 गोठ्यामध्ये शेण काढत असताना बिबट्याने पुन्हा अचानक हल्ला करून जखमी केले. त्यांचेवर त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे औषध उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकच्या सिविल हॉस्पिटल येथे दाखल केले आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे.
 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी करून शोध मोहीम सुरू केली असून बिबट जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. गावामध्ये, मळ्यात मध्ये जनजागृती केली जात आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments