Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंग्रजीच्या भीतीने रायगडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Webdunia
शनिवार, 5 मार्च 2022 (12:49 IST)
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडली. सानेगावमधील प्रकाश बांगारे (१७) या विद्यार्थ्याने इंग्रजीचा अभ्यास झाला नसल्याने नापास होण्याच्या भीतीने शुक्रवारी पेपर सुरू होण्यापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केली. मानसिक तणावामुळे प्रकाशने हे टोकाचे पाऊल उचलले.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची १२ वीची ऑफलाइन परीक्षा शुक्रवारी ४ मार्चपासून सुरू झाली. दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा जवळपास बंदच आहेत. मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले. मात्र ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नसल्याने आणि काही ठिकाणी इंटरनेट चालत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांची तयारी झालेली नाही. असे असताना ऑफलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे इंग्रजीचा पेपर सुरू होण्यापूर्वी त्याने शाळेजवळच्या जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून ते अधिक तपास करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

RCB vs KKR Playing-11: आरसीबी-केकेआर सामन्याने लीग पुन्हा सुरू होणार, प्लेइंग 11जाणून घ्या

World Telecommunication Day 2025 : जागतिक दूरसंचार दिन कधी आणि कसा सुरू झाला इतिहास, उद्दिष्टये जाणून घ्या

World Hypertension Day 2025 : जागतिक उच्च रक्तदाब दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, जाणून घ्या २१ मे पर्यंत महाराष्ट्रात हवामान कसे राहील?

Doha Diamond League : नीरज चोप्राने 90 मीटरचा टप्पा ओलांडला,कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रो फेकला

पुढील लेख
Show comments