Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन बहिणींनी रेल्वेतून उडी मारून आपले आयुष्य संपविले

Webdunia
शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (18:03 IST)
दोन आयटीआयच शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणींनी धावत्या रेल्वेतून उडी मारून आपलं आयुष्य संपविण्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली आहे. अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मनारखेड रेल्वे चौकी परिसरात या दोघी मुलींनी मुंबई- कलकत्ता रेल्वेतुन एकापाठोपाठ उडी मारली. 
 
कुमारी बेबी राजपूत वय वर्षे 19 राहणार चापा जिल्हा जांगीर छत्तीसगड आणि कुमारी पूजा गिरी वय वर्ष 19 राहणार चापा जिल्हा जांगीर, छत्तीसगड असे या मयत मुलींची नावे आहेत. या दोघी सक्ख्या मावस बहिणी आहे. या मुलींनी काही दिवसांपूर्वी कोपाची ऑनलाईन परीक्षा दिली असून त्यांचे आयटीआय मध्ये कोपाचं प्रशिक्षण सुरु होते.
 
या दोघी मुलींच्या अंगावर आयटीआयचा युनिफाँर्म असून चार दिवसांपूर्वी आम्ही आयटीआयला जातो असं सांगून घरातून बाहेर पडल्या आणि परत आल्या नाही. त्यांचा शोधाशोध घेतल्यावर ही त्या सापडल्या नाही म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी चापा पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार केली. दरम्यान त्यांनी रेल्वेतून उडी मारून आपले आयुष्य संपविले.  
 
या दोघी बहिणी छत्तीसगड राज्यातील रहिवासी असून त्यांनी रागाच्या भरात येऊन घर सोडले आणि नंतर रेल्वेतून उडी मारून आपले आयुष्य संपविले. दोन मुलींचे मृतदेह रेल्वेच्या रुळावर आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळतातच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनास पाठविले. त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळतातच दोन्ही कुटुंब दुःखात बुडाले आहे. त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे. त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले असून त्यांच्यावर उद्या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. 
 
पोलिसांना प्रवाशांनी दिलेल्या  माहितीनुसार, या दोघीनी एका पाठोपाठ रेल्वेतून उडी मारली. आत्महत्येचे कारण अद्याप माहित नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

बुलढाणा जिल्ह्यातील धमक्यांना कंटाळून प्रियकराने केली आत्महत्या... तीन वर्षांच्या प्रेमकथेचा दुःखद अंत!

पुढील लेख
Show comments