Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'अवयव विक्रीला काढले तरी लाज नाही...' शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विजय वडेट्टीवार यांनी सरकारला घेरलं

Vijay-Wadettiwar
, सोमवार, 11 डिसेंबर 2023 (20:21 IST)
नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला आजपासून सुरूवात होत आहे. या अधिवेशनात आज शेतकरी प्रश्नांवर चर्चा झाली. दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, गारपीट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभावाचे गाजर, निर्यात बंदीचा फटका यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर हल्लाबोल केला.
 
दरम्यान "सरकारने ट्रीगर एक मध्ये 194 तालुके असताना केवळ 40 तालुकेच दुष्काळी घोषीत केले. यावेळी सरकारने केवळ एमआर-सॅक व महा-मदत ही संगणक प्रणालीचा आधार घेतला. पण शेतकऱ्यांचे अश्रू पाहिले नाहीत. शेतकऱ्यांनी आपले अवयव विकण्यासाठी काढले आहेत. तरी सरकारला लाज वाटत नाही..." अशी टीका यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केली.
 
तसेच "शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत अपेक्षित नाही. सरसकट हेक्टरी किमान ५० हजार रूपये आणि बागायतीखालील क्षेत्राकरिता प्रति हेक्टरी किमान १ लाख रूपये तात्काळ मदत देण्याची आवश्यकता आहे. 24 ऑगस्टला 2023 आम्ही दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारला पत्र दिले. पण सरकारला जाग आली नाही. कर्नाटकच्या धर्तीवर सरकारने अर्ली ड्रॉट जाहीर केला असता तर शेतकऱ्यांचे भले झाले असते..." असे वडेट्टीवार म्हणाले.
 
महाराष्ट्रात दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. "देशातील जवळपास 37 टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. राज्यात सुमारे 3000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु सरकार गंभीर नाही.
 
शेतकरी होरपळला असताना तुम्ही नियम, निकष, जीआरची भाषा करता. जीआर, नियम, निकष शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करत असतील तर बदलले पाहिजेत.." अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले.
 
"आस्मानी संकटाबरोबरच तुमच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. तरी देखील तुम्ही उजळ माथ्याने राज्यात फिरताय. उरली सुरली थोडी शिल्लक असेल तर शेतकऱ्यांसाठी ठोस मदत जाहीर करा. पीकविमा कंपन्यांचे मुजोर प्रतिनिधी शेतकऱ्यांचा अपमान करत आहे. अपमानास्पद वागणूक देत आहेत.." अशी जहरी टीका  यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केली.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रीकाकुलम : स्टेट बँकेतून 7 किलो सोनं गायब कसं झालं? तारण ठेवलेलं सोन हरवलं तर काय करायचं?