Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सांगलीला पुन्हा इशारा कृष्णा नदीची पातळी वाढली, नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा

Webdunia
गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (10:15 IST)
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात महापुरामुळे  उद्ध्वस्त केलेले संसार सावरण्यास सुरुवात झाली होती, मात्र त्यात पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली भागातील  नागरिकांची पुन्हा चिंता वाढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृष्णा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कोयना धरणातून पाण्याचा 73 हजार 63 क्युसेक्स विसर्ग सुरू असून, पुढील 2 दिवस हा विसर्ग असाच सुरू राहणार आहे, त्यामुळे सांगलीत पाण्याची पातळी  पुन्हा  वाढणार आहे. शहरातील असलेल्या आयर्विन पुलाजवळ सध्या 10 फूट 6 इंच पाणी पातळी आहे. हा विसर्ग असाच सुरू राहिल्यास ती पाणी तापळी 34 फूटावर वाढणार आहे. आयर्विन पुलाजवळ इशारा पातळी 40 फूट, तर धोका पातळी 45 फूट आहे. पाणी नदी पात्रामध्येच रहाणार असले, तरी नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील आणि महानगरपालिका क्षेत्रातील लोकांना यामुळे धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात जावू नये, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्यात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

International Firefighters' Day 2025 आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिनाचा इतिहास, महत्त्व

LIVE: नागपुरात हवामान खात्याकडून पावसाचा यलो अलर्ट जारी

साबरकांठा जिल्ह्यात दुर्दैवी अपघात सहा जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी

भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान घाबरला,फटाके आणि लाऊडस्पीकरवर बंदी

पहलगाम हल्ल्याच्या तपासासाठी एनआयए 3D मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करणार, काय आहे हे

पुढील लेख
Show comments