Festival Posters

पाणी स्थिती गंभीर चोरट्यांनी चोरले पाणी, पोलिसांत तक्रार

Webdunia
मंगळवार, 14 मे 2019 (09:36 IST)
4
पूर्ण राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. आता यात भर म्हणून पाण्याच्या चोरीची भर पडली आहे. चोरांनी आता साठवलेल्या पाण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
 
मनमाड शहरातील श्रावस्ती नगर भागात अशीच एक घटना घडली असून, घटनेत चोरट्यांनी सामाजिक कार्यकर्ते विलास आहिरे यांनी पिण्यासाठी टाकीत साठवून ठेवलेल्या ३०० लिटर पाण्यावर डल्ला मारला आहे. घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. एकीकडे अगोदरच शहरातील नागरिक भीषण पाणी टंचाईला तोंड देत असताना दुसरीकडे पाणी चोरीच्या या  घटनेमुळे नागरिकांना धक्का बसला आहे.
 
या चोरी प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ  गाठल्यामुळे मनमाड शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरात २२ ते २५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पालिकेतर्फे दिले जाणारे हे पाणी एक महिना पुरवावे लागते. त्यामुळे ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी घरातील ग्लासा पासून मोठ्या भांडया पर्यंत पाणी भरून ठेवण्यासाठी घरातील सर्वच जण धडपड करतात.
 
विलास आहिरे यांनी त्यांच्या छतावर असलेल्या टाकीत पाणी भरून ठेवले होते. त्यांचा घराचा  जिना बाहेरून असल्यामुळे अज्ञात चोरट्यांनी छतावर जावून टाकीत भरून ठेवलेल्या ५०० पैकी ३०० लिटर पाणी चोरून पसार झाले आहेत. सकाळी टाकीतून पाणी येत नसल्याचे पाहून आहिरे छतावर जावून पहिले असता टाकीत पाणी नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी याबाबत रीतसर पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दिला आहे. यामुळे आता पाण्याला सुरुक्षा देणे गरजेचे झाले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

Bank Holidays in February: फेब्रुवारी महिन्यांत बँका एकूण 9 दिवस बंद राहणार

बजेटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांचा निवडणूक प्रचार स्थगित करण्याचा निर्णय

समृद्धी एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ठाण्यातील आई व मुलाचा दुर्देवी मृत्यू

अर्थसंकल्पात आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवली, परदेशातील शिक्षण स्वस्त झाले

पुढील लेख
Show comments