suvichar

अजब, चक्क झाडाच्या खोडातून वाहू लागले पाणी

Webdunia
गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (08:54 IST)
नाशिकमध्ये चक्क झाडाच्या खोडातून पाणी  वाहू लागले आहे. ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात  असलेल्या वणी  नाशिक रोडवरील ओझरखेडयेथे घडला आहे. गुलमोहराच्या झाडातून अक्षरशः पाण्याचा झरा वाहू लागला आहे.
 
लखमापुर फाट्यापासून हाकेच्या अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहराच्या झाडाच्या खोडातून पाणी अखंड पाणी वाहत आहे. सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी हाच रस्ता असल्याने मोठी वर्दळ या ठिकाणी असते. त्यामुळे येणारे-जाणारे नागरिक थांबून हा सर्व प्रकार पाहत असून आपल्या मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत आहे. तर या गोष्टीला धार्मिक तर्क देखील लावले जात आहे. अनेक लोक बाटलीत हे पाणी भरून पाहत आहे, काही जण पाण्याला हात लावून पाहत आहे.
 
नागरिक याबाबत तर्कवितर्क लावत असतांना या गुलमोहराच्या खालून काही वर्षांपूर्वी पाण्याची पाईपलाइन गेली होती. त्यानंतर त्याच्यावरती झाड लावण्यात आले. हे झाड सुकलेले होते. त्यानंतर पाण्याची पाईपलाईन झाडामध्ये  शिरली असावी त्यामुळे थेट प्रवाह हा झाडाच्या खोडातून बाहेर पडत असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. 
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

नाशिक अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा, घोटाळ्यात रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर खरातच्या भागीदार

माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपतींच्या पुतळ्यावरून वाद; कलम १४४ लागू; पोलीस बंदोबस्त तैनात

हवामान खात्याने आजही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला

राज्य सरकारने परवानगीशिवाय शाळांच्या नावात 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'वर्ल्ड' किंवा 'युनिव्हर्सल' असे शब्द वापरण्यावर बंदी घातली

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शाळांमध्ये दररोज 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मांडला

पुढील लेख
Show comments