Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाऊस कधी थांबणार? IMD ने दिली महत्त्वाची माहिती

Webdunia
शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (15:22 IST)
यंदा नैऋत्य मान्सून वाऱ्यांसह पडणाऱ्या पावसाच्या हंगामात चांगला पाऊस झाल्याचे भारतीय हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे. 1 जूनला या पावसाला सुरुवात होऊन जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सर्वसाधारण सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे. आता परतीच्या मान्सून विषयी हवामान विभाग दिल्लीचे तज्ज्ञ के.एस. होसळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.मान्सूनचा परतीचा प्रवास  वाव्य भारतातील काही भागांतून येत्या 6 ऑक्टोबरला सुरु होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या परतीच्या पावसाविषयी 4 आठवड्यांचा अंदाज व्यक्त केला आहे.
पहिल्या आठवड्यात देशाच्या पश्चिम, वायव्य ( या भागाच्या आजूबाजूच्या मध्य भारतातील बहुतेक प्रदेशामध्ये सर्वसाधारण प्रमाणाहून अधिक पावसाची शक्यता आहे.
दुसऱ्या आठवड्यात देशाच्या मध्य भागातील राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण सर्वसाधारण प्रमाणाहून जास्त राहील. तर वायव्य भागात हे प्रमाण सर्वसाधारण असेल. यानंतर देशातील वायव्य प्रदेशातील पावसाचं प्रमाण कमी होत जाईल.
 
तिसऱ्या आठवड्यात देशाच्या पूर्व भागात पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे.चौथ्या आठवड्यात देशातील बहुतेक ठिकाणचा पाऊस सर्वसाधारण प्रमाणाहून कमी होईल.यंदाचा मान्सून  हंगाम 1 जूनला सुरु झाला असून 30 सप्टेंबरला संपत आहे.या हंगामात वायव्य भागात 96 टक्के, मध्य भागात 104 टक्के, पूर्व आणि ईशान्य भागांत 88 टक्के तर दक्षिणेत 111 टक्के असं विभागनिहाय पावसाचं प्रमाण राहिलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पालघर मध्ये केमिकल कारखान्यात गॅस गळती, १० कामगारांची प्रकृती खालावली

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments