Marathi Biodata Maker

अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव आज दुपारनंतर मुंबईत आणणार

Webdunia
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (10:33 IST)

अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव आज दुपारनंतर  मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे. दुबईतील कायदेशीर प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे सोमवारी मृतदेह आणता आला नव्‍हता. दरम्यान, मुंबईत अंत्यविधीची तयारी पूर्ण झाली आहे.

श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातमीनंतर रविवारपासूनच त्यांच्या मुंबईतील निवासस्‍थानाबाहेर चाहत्यांनी गर्दी केली आहे. सोमवारीही मृतदेह आणला जाण्याची शक्यता असल्याने चाहत्यांनी गर्दी केली होती. मात्र, दुबईतील कायदेशीर प्रक्रियेला विलंब झाला. 

दरम्यान, श्रीदेवीचा मृत्यू बाथ टबमध्ये बुडून झाल्याचे एका अहवालानुसार पुढे आले असून त्यांचा मृत्यू संशयाच्या भोवर्‍यात असल्याचे बोलले जात आहे. तसेच श्रीदेवीच्या शवविच्‍छेदन अहवालात अल्‍कोहोलचे अंश आढळले आहेत. दुबई पोलिसांनी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर व बहिण श्रीमाला यांची चौकशी केली आहे.  या प्रकरणाभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाल्यामुळे श्रीदेवी यांच्या मृतदेहाचे आणखी एकदा शवविच्छेदन होऊ शकते असेही बोलले जात आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

दीपिका कक्करच्या सासऱ्यांना ब्रेनस्ट्रोक, रुग्णालयात दाखल

मुंबईच्या गजबजलेल्या माहीम भागात असलेली सर्वात हॉंटेड ठिकाणांपैकी एक ''डिसूझा चाळ''

'है जवानी तो इश्क होना है' चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

पुढील लेख
Show comments