Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा या वर्षी 29 ऑगस्ट रोजी होणार नाही,कारण जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (15:15 IST)
देशात दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. पण यावेळी या तारखेला आयोजित केले जाणार नाही. देशात दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्याला यावर्षी विलंब होणार आहे कारण सरकारला निवड समितीने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या पॅरा ऍथलिट्स च्या कामगिरीचा समावेश करावा अशी इच्छा आहे. पॅरालिम्पिक खेळ टोकियोमध्ये 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान आयोजित केले जातील. राष्ट्रीय पुरस्कार — खेल रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आणि ध्यानचंद पुरस्कार  दरवर्षी 29t ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशाच्या राष्ट्रपतींनी दिले जातात या दिनी महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांची जयंती देखील आहे .

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की,पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी निवड पॅनेलची स्थापना करण्यात आली आहे, परंतु निवड प्रक्रियेस पुढे जाण्यापूर्वी त्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावीशी वाटते. "राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीची स्थापना या वर्षी करण्यात आली आहे, परंतु पॅरालिम्पिकचे आयोजन केले जाणार आहे त्यामुळे आम्हाला पॅरालिम्पिक विजेत्यांचाही समावेश करायचा आहे," असे ठाकूर राष्ट्रीय युवा पुरस्कार सोहळ्यादरम्यान म्हणाले. मला आशा आहे की ते चांगले करतील.
 
मंत्रालयातील एका सूत्राने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, "मागच्या वेळी प्रमाणे या वर्षीही पुरस्कार वितरण समारंभ व्हर्च्यूवल केले जाऊ शकतात." दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रिया 5 जुलै रोजी संपली. साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर, ज्या खेळाडूंनी अर्ज केला त्यांना ऑनलाइन नामांकन करण्याची परवानगी होती, परंतु राष्ट्रीय महासंघांनी त्यांचे निवडलेले खेळाडूही पाठवले. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय तुकडीने सर्वोत्तम कामगिरी केली आणि देशातील खेळाडूंनी एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यसह एकूण सात पदके जिंकली.भारत 54 पॅरा इथलीटसची सर्वात मोठी तुकडी टोकियोला पाठवत आहे. गेल्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये, भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य यासह चार पदकांसह पुनरागमन केले. 
 
देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान, खेलरत्न, नुकतेच हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या नावावर ठेवण्यात आले, जे यापूर्वी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावावर होते. गेल्या वर्षी क्रीडा पुरस्कारांच्या बक्षीस रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आली होती. खेलरत्नवर आता 25 लाखांचे बक्षीस आहे, जे आधीच्या साडेसात लाखांपेक्षा खूप जास्त आहे. अर्जुन पुरस्काराची बक्षीस रक्कम 5 लाखांवरून 15 लाख रुपये करण्यात आली आहे. याआधी द्रोणाचार्य (आजीवन) पुरस्कारप्राप्त व्यक्तींना 5 लाख रुपये देण्यात आले होते जे वाढवून 15 लाख रुपये करण्यात आले. द्रोणाचार्य (नियमित) पुरस्कार प्राप्त करणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षकाला पाच लाखांऐवजी 10 लाख रुपये मिळतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments