Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tokyo Paralympics 2020: मनीष नरवाल आणि सिंहराज अडानाच्या कौशल्याने ने भारताला सुवर्ण आणि रौप्य पदके मिळवून दिली

Webdunia
शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (10:41 IST)
जपानची राजधानी टोकियो येथे खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये शनिवार भारतासाठी खूप आनंद घेऊन आला. येथे पॅरा खेळाडू मनीष नरवालने नेमबाजीच्या P4 मिश्रित 50 मीटर पिस्तूल SH1 स्पर्धेत सुवर्णपदकावर निशाणा साधला, तर त्याच स्पर्धेत भारताच्या सिंगराज अडानाने रौप्यपदकावर कब्जा केला. या सुवर्ण पदकासह  मनीषने भारताला टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. 19 वर्षीय नरवालने 218.2 गुण मिळवत पॅरालिम्पिक खेळांचा विक्रम केला. त्याचबरोबर मंगळवारी कांस्यपदक जिंकणाऱ्या अडानाने 216.7 गुण मिळवून रौप्य पदक जिंकले.
 
रशियन ऑलिम्पिक समितीचे सर्जेइ मालिशेव यांनी 196.8 गुणांसह कांस्यपदक जिंकले. यापूर्वी पात्रता फेरीत अडाना 536 गुणांसह चौथ्या आणि नरवाल 533 गुणांसह सातव्या स्थानावर होते. भारताचे आकाश 27 वे स्थान मिळवून अंतिम फेरीत पोहोचू शकले नाही. कारण या मध्ये ,नेमबाज फक्त एक हाताने पिस्तूल धरतात,आणि त्यांच्या एका हात किंवा पायात विकृती आहे जी पाठीच्या कण्याला दुखापत झाली असल्यावर होते.या मध्ये काही नेमबाज उभे राहून आणि काही बसून लक्ष्य साध्य करतात.
 
मनीषच्या आधी 19 वर्षीय अवनी लेखारा हिने 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच 1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक होते. याशिवाय अवनीने 50 मीटर रायफल 3 पोझिशन एसएच 1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.अशा प्रकारे अवनी दोन पॅरालिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. त्याच्याशिवाय, भालाफेकपटू सुमित अँतीलने या खेळांमध्ये उत्कृष्ट पदार्पण केले, पुरुषांच्या एफ 64 स्पर्धेत अनेक वेळा विश्वविक्रम मोडत दुसरे सुवर्णपदक मिळवून. त्याने दिवसभरात पाच वेळा 62.88 मीटरचा स्वतःचा मागील विश्वविक्रम चांगला केला आणि सुवर्णपदक पटकावले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments