Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिककरांना गडकरींचे गिफ्ट! नाशिकरोड ते द्वारका डबलडेकर उड्डाणपुलाला मंजुरी

Webdunia
सोमवार, 19 डिसेंबर 2022 (08:37 IST)
नाशिक – केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नाशिककरांना मोठे गिफ्ट दिले आहे. आज ते नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते तब्बल १८०० कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी गडकरींनी घोषणा केली की नाशिकरोड ते द्वारका या दरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात येत आहे. या कामासाठी १६०० कोटी रुपये लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
 
गडकरी यांनी भूमीपूजन केलेल्या प्रकल्पांमध्ये गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण तसेच मुंबई -आग्रारोडवरील आडगाव शिवारातील दहावा मैल, जवळके फाटा तसेच नाशिक तालुक्यातील आंबेबहूला येथे बोगदा यांचाही समावेश आहे. यामुळे नाशिक-मुंबई दरम्यानच्या वाहतुकीची कोंडी टाळणार असून खान्देशातील प्रवाशांना समृद्धी महामार्गाला सहजपणे जॉईन होता येणार आहे. तर, बोगद्यांमुळे अपघात टळण्यास मोठी मदत होणार आहे.
 
गोंदे फाटा ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्यावर सतत वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. पिंपरी सदो पासून समृद्धी महामार्ग हा अगदीच हाकेच्या अंतर्गत आहे. त्यामुळे नाशिक – मुंबई दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. नासिक – मुंबई महामार्गावरील वाहतूक टाळण्यासाठी आणि धुळे , जळगाव, नंदुरबार येथील प्रवाशांना पिंपरी सदो शिवारातील समृद्धी महामार्गावर लवकरात लवकर पोहोचण्यासाठी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण होणे किती गरजेचे आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments