Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईला पावसाने जोरदार झोडपले, अनेक ठिकाणी पाणी साचले, वाहतुकीवर मोठा परिणाम

Webdunia
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या  मुंबईत येथे  3 आठवड्यापासून थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईतील  हिंदमाता परिसरात रात्री,  किंग सर्कल भागात सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम दिसून येतो आहे. सकाळी ऑफिसच्या वेळेत रस्त्यांवर पाणी साचल्याने चाकरमान्यांचे फार  हाल झाले. सोबतच दक्षिण मुंबईला देखील  पावासाने झोडपलं असून  उपनगरातही जोरदार  पाऊस झाला आहे.
 
अंधेरी, वांद्रे, दादरमध्येही पावसाचा जोर
 
अंधेरी, वांद्रे, दादर या ठिकाणी जोरदार पावसामुले  अनेक ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी  साचले होते. त्यामुळे  पायी जाणाऱ्यांसह,  दुचाकी,  चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत होते. तर  सायन ते सीएसएमटी दरम्यान ठिकठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल  त्यामुळे काही प्रमाणात रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम  झाला आणि नेहमी प्झारमाणे मध्य रेल्वेवर लोकल उशिराने धावल्या आहेत. 
 
वसई-विरार-नालासोपाऱ्यात पाणीच पाणी 
 
वसई-विरार-नालासोपारा परिसरातही पाऊस सुरु असू,  मंगळवारी सायंकाळी  पावसाने जोरदार आगमन केलं. रात्रभर पावसाने वसई-विरारला झोडपलं. वसई-विरार-नालासोपाऱ्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. कल्याण-डोंबिवलीमध्येही मंगळवारी मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. तर बुधवारी पुन्हा  सकाळी पावसाने पुन्हा जोर धरला. संततधार पावसामुळे कल्याणमधील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कल्याणच्या अहिल्याबाई चौक, मोहम्मद अली चौक, शिवाजी चौक, कल्याण पूर्वेतील राजाराम पाटील नगर अशा अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ठाण्यात जोरदार पावसामुळे  जागोजागी पाणी साचले असून,  रेल्वे सेवेवरही या मुसळधार पावसाचा परिणाम झाल आहे.  मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या रिसेप्शन समारंभाला मोदी आणि शाह यांच्यासह सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची उपस्थिती

मोहन भागवत अमेरिका, युके आणि कॅनडा दौऱ्यावर जाणार; शताब्दी वर्षानिमित्त भारतीयांशी संवाद साधणार

चंद्रपूरमध्ये वडिलांनी दोन मुलांचा ब्लेडने गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर अवस्थेत

नांदेडमधील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; ३२ विद्यार्थी आजारी पडले

पुणे-सातारा महामार्गावर कार उलटून ट्रकला धडकली, भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू

पुढील लेख
Show comments