Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठाची बॅकलॉगची परीक्षा उद्यापासून

Webdunia
सोमवार, 7 डिसेंबर 2020 (16:45 IST)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठाची बॅकलॉगची परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे. 8 ते 23 डिसेंबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेला 2 लाख 18 हजार विद्यार्थी बसणार असून विद्यापीठाने परीक्षेची संपूर्ण तयारी केली आहे. बॅकलॉगच्या परीक्षेत सुमारे 2,200 वियांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला दोन लाख 18 हजार बसणार आहेत. तर 2013च्या पॅटर्नच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाच्या बॅकलॉगच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणार आहेत.
 
बॅकलॉग परीक्षेच्यापूर्वी तीन दिवस विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर उद्यापासून विद्यार्थ्यांना थेट मुख्य परीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. एकूण तीन जिल्ह्यातील विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
 
पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या. विद्यापीठाने अंतिम वर्षाची ऑनलाईन परीक्षा घेतली होती. यावेळी अनेक अडचणी आल्या होत्या. उद्यापासून सुरू होणाऱ्या बॅकलॉगच्या परीक्षेत या अडचणी येऊ नयेत म्हणून विद्यापीठाने सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लॉग इन होते का? त्यांचे मेल आयडी व्यवस्थित आहेत का? परीक्षा पेपर ब्लर तर दिसत नाही ना?, पेपर ओपन होतो का? टायपिंग करताना काही अडचणी तर येत नाही ना? आदी गोष्टींच्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

RCB vs CSK :आरसीबीचा आठवा विजय, चेन्नईचा दोन धावांनी पराभव

International Firefighters' Day 2025 आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिनाचा इतिहास, महत्त्व

LIVE: नागपुरात हवामान खात्याकडून पावसाचा यलो अलर्ट जारी

साबरकांठा जिल्ह्यात दुर्दैवी अपघात सहा जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी

भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान घाबरला,फटाके आणि लाऊडस्पीकरवर बंदी

पुढील लेख
Show comments