Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'आगे आगे मुंढे पीछे पड गये गुंडे'

Webdunia
शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (08:05 IST)
नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना नागपूरकरांनी आगळावेगळा निरोप दिला. नागपुरातील शासकीय निवासस्थानातून मुंबईकडे रवाना होत असताना नागरिकांनी मुंढे यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी केली आणि त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. तर काही तरुण मुंढे यांनी नागपूर सोडू नये म्हणून त्यांच्या गाडीसमोर आडवेही झाले होते. तर अनेक जण त्यांच्या गाडीमागेही धावत होते. नागपूरकरांचा हात जोडून नमस्कार करत तुकाराम मुंढे यांनी त्यांचा निरोप घेतला. तुकाराम मुंढेंचं समर्थन करणाऱ्या नागपूरकरांकडून यावेळी 'We Want Munde Sir' तसंच 'आगे आगे मुंडे पीछे पड गये गुंडे' अशा घोषणा दिल्या.
 
नागपुरातील सामान्यजनांच्या पसंतीस खरे उतरलेले आयुक्त तुकाराम मुंढे हे मुंबईस रवाना होणार होते. त्याकरिता त्यांना निरोप देण्यासाठी गुरुवारपासूनच त्यांच्या घरी रांग लागली होती. कुणी पुष्पगुच्छ आणत होते तर कुणी त्यांचे रेखाचित्र काढून आणत होते. कुणी त्यांना राखी बांधत होते तर कोणी भेटवस्तू आणत होते. जो तो आपापल्या परीने आपल्या भावना व्यक्त करत होता. 
 
बघता बघता गर्दी वाढू लागली. तुकाराम मुंढे परत या अशा घोषणा हेवेत निनादू लागल्या. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही त्या ठिकाणी हजर झाले होते. पोलीस बंदोबस्त देखील तगडा होता. शेवटी साडेदहाच्या सुमारास तुकाराम मुंढे बाहेर आले. त्यांनी उपस्थित नागरिकांना अभिवादन केले व ते गाडीत बसले. त्यांच्या गाडीवर फुलांचा, घोषणांचा, गुलालाचा वर्षाव करण्यात आला. मी तुकाराम मुंढे, आय सपोर्ट तुकाराम मुंढे, माय रियल हिरो तुकाराम मुंढे अशा आशयाचे अनेक फलक त्या ठिकाणी झळकत होते. तर काही तरुण ‘आगे आगे मुंढे पीछे पड गये गुंडे’ अशा घोषणा देत होते. मात्र, गर्दी पाहून मुंढे तिथे थांबले नाहीत. ते फक्त लोकांना अभिवादन करत होते. उपस्थित पोलिसांनी त्यांना अभिवादन केले. त्यांचा स्वीकार त्यांनी केला आणि ते विमानतळाकडे रवाना झाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

भिवंडीमध्ये पाण्याच्या टाकीत पडून सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू

LIVE: इगतपुरीमध्ये पाणीटंचाईविरोधात महिलांनी काढला मोर्चा

'पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्यावा', राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना आवाहन

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी समावेशक, प्रगतीशील आणि विकसित महाराष्ट्र निर्माण करण्यावर दिला भर

१७ वर्षांपासून भारतात राहत होता, पाकिस्तानला पाठवण्याच्या तयारीत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने नागरिकाचे निधन

पुढील लेख
Show comments