Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निवडणूकांच्या आधीच आम्ही युती जाहीर करत आहोत : प्रकाश आंबेडकर

Webdunia
सोमवार, 13 डिसेंबर 2021 (14:56 IST)
मुंबई महापालिका निवडणूकांसाठी तिसरी आघाडी म्हणून उतरण्याचा आमचा मानस आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूकांबाबतची चर्चा सध्या अनेक सामाजिक संघटनांसोबत होते आहे. राजकीय पक्षांची एक युती म्हणून वंचित बहुजन आघाडी, इंडियन युनियन मुस्लिम लिग, राष्ट्रीय जनता दल यांच्याशी बैठका होऊन युती करायचा निर्णय झाला आहे. आगामी महापालिका निवडणूकांच्या आधीच आम्ही ही युती जाहीर करत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 
 
युतीमार्फत जानेवारी महिन्यात जागांची घोषणा केली जाणार आहे. तसेच प्रचाराचा भाग म्हणून आम्ही प्रचाराला सुरूवात करत आहोत, असेही ते म्हणाले. आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत निकाल येण्याच्या मार्गावर आहे. निवडणूका पुढे ढकलण्याबाबत संविधानात अधिकार नाही. जे काही हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय करते आहे, ते घटनेच्या विरोधात असल्याचेही ते म्हणाले.
 
जुन्या नगरपालिका, महापालिका, नगर परिषदा या पाच वर्षांच्या कालावधीनंतर विसर्जित करणे अपेक्षित आहे. त्यामुळेच नव्या सभागृहात पाच वर्षांनी ज्यांची सत्ता येणार त्यालाच पाच वर्षे करण्याचा पाच वर्षे राज्य करण्याचा मॅण्डेट आहे. राज्यात वारंवार कोविडच्या नावाखाली निवडणूका पुढे ढकलण्याचा भाग सुरू आहे. हा प्रकार चुकीचा असल्याचेही ते म्हणाले. उद्या देशात युद्ध जरी सुरू झाले, तरीही आपत्कालीन परिस्थिती जाहीर करायची झाली, तरीही निवडणूका पुढे ढकलता येत नाहीत. निवडणूकांच्या आधीच आम्ही आघाडी जाहीर करतो आहोत, असेही ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments